Suvachne Tukobanchi

200.00

श्री सार्थ तुकाराम गाथा म्हणजे पाचवा वेद. गाथेचा लौकिक जीवनाशी जवळचा संबंध आहे. प्रत्येकाचे जीवन सुखी, समाधानी करण्याची ताकद प्रत्येक अभंगांमध्ये आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात, प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी प्रत्येकाकडून गाथा वाचन होणे गरजेचे आहे. गाथेतील निवडक अभंगातील विचार तसेच गाथेतील वैज्ञानिक संकल्पना यांना उजाळा देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. तरुणांनी गाथा वाचावी व जीवन सुखी, समाधानी करावे

5 in stock

SKU: 583 Category:
Description

Description

जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. विविध उपक्रमांमधून जगद्गुरूंचे विचार घरोघरी पोहोचले आहेत. वास्तववादी, प्रयत्नवादी जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या सदगुरु तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे जीवन जगण्याची शिदोरी आहे.
श्री सार्थ तुकाराम गाथा म्हणजे पाचवा वेद. गाथेचा लौकिक जीवनाशी जवळचा संबंध आहे. प्रत्येकाचे जीवन सुखी, समाधानी करण्याची ताकद प्रत्येक अभंगांमध्ये आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात, प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी प्रत्येकाकडून गाथा वाचन होणे गरजेचे आहे. गाथेतील निवडक अभंगातील विचार तसेच गाथेतील वैज्ञानिक संकल्पना यांना उजाळा देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. तरुणांनी गाथा वाचावी व जीवन सुखी, समाधानी करावे यासाठीची ही धडपड !!!

Additional information

Additional information

Weight 0.2 kg
Dimensions 24 × 16 × 3 cm
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Suvachne Tukobanchi”

Your email address will not be published. Required fields are marked *

More Products

Lagnachi Purvatayari

30.00

The marriage in Hindu society is full of many events which are to be performed rituals stically. We get information about them in detail and the serial form of events and their requirements in this book.

Shrimayurbhattavirchita Suryashatakam

100.00

By reading the lifestyle and thinking of the poet helps to know the inner forces of his personality. In this treaties we get the information of the time, work and life of the po?t Mayur. The importance of the sungod, being the original source of all happenings and a divine force of all lives on earth is praised in the suryashatak a long poem of 100 stanzas. The glorious rays, the chariot of sun God, the horses driving it, the driver Aaruni and solar system has been beautifully predicted in the form of melody in this book.

Kitkanchi Navlai

115.00

The life cycle of man depends on many factors in which insects are also included. They also play a majer role either in creative or destructive manner. We get ample information about them in this book. A wonderful world of lookwarm, spider, cockroch, house fly, mosquitos, beetles is explained in simple words. Writer Prof. Sudheer Sahasrabuddhe.

Ganitachya Gamti Jamti

200.00

सर्वसाधारण माणसाच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात गणित विषयाबद्दलची एक प्रकारची भिती असते. विज्ञान एक वेळ चालेल परंतु गणित नको 95% व्यक्ती गणितापासून दूर जातात. गणित हा मनोरंजनाचा विषय आहे. हीच संकल्पना लोकांना पटत नाही परंतु गणिताच्या गमती जमती या पुस्तकातून वाचकांचे मनोरंजन करेल, त्यांची गणिताची भिती जाईल आणि त्यांना गणिताची आवड निर्माण करण्याची जादू या पुस्तकाच्या मुळाशी आहे. या पुस्तकातील गणितांना गणिताचे नाव न देता, त्यांना व्यवहारातील नावे दिली आहेत. जेणेकरून भावनिक जवळीक निर्माण व्हावी, ते आपलेसे वाटावे यासाठी. जसे की मित्र, एका नजरेत घायाळ, डोंबारी, नटरंग, कोळ्याचे जाळे, माझा लकी नंबर, रावण, हरिहरेश्वर, सुंदरता इत्यादी. तसेच मोठी गणितं डोळ्यांनी सोडवता येतील व त्याचा आनंद घेता येईल व गणिताची गोडी उत्पन्न होण्यास नक्कीच मदत होईल.
सर्व शास्त्रांचे मूळ गणित आहे. जगाला मोठी देणगी भारतीय गणिताने दिली ती म्हणजे शून्याचा शोध. गणित भारतात जन्मले व प्राचीन भारतातील गणित तज्ञांनी ते वाढवले व सर्व जगात पसरवले. हा इतिहास प्रत्येक भारतीयांपर्यत पोहोचवण्याचे कार्य झाले पाहिजे हीच खरी अपेक्षा बाळगतो.

Gosht Berrister Sahebanchi

150.00

 

‌‘गोष्ट बॅरिस्टरसाहेबांची‌’ या पुस्तकातील व्यक्तींच्या गोष्टी आपणास नक्की प्रेरणा देतील. कदाचित आपल्या आयुष्याला नवीन वळण देतील. बॅरिस्टरसाहेब म्हणजे कोण? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांचा रथ पुढे नेणाऱ्या त्यागी माणसाचं नाव आहे राजाभाऊ. राजाभाऊ म्हणजे त्याग. राजाभाऊ म्हणजे आंबेडकरी चळवळीचा वाघ. ज्याने फक्त समाजाचा संसार सांभाळला, समाजाच्या हितासाठी देह झिजवला अशा चंदनाचे नाव म्हणजे राजाभाऊ. कोणत्याही स्वार्थाशिवाय सामान्य माणसांना आपली वैभवी सावली देणाऱ्या वटवृक्षाचे नाव म्हणजे राजाभाऊ. कष्टकरी गरीब माणसाच्या कल्याणासाठी लढणारा योद्धा म्हणजे राजाभाऊ. आपल्या विद्वत्तेचा देशाच्या कल्याणासाठी विचार करणारी व्यक्ती म्हणजे राजाभाऊ. आंबेडकरी विचारांवर खंबीर राहणाऱ्या आंबेडकरवादी योद्ध्याचे नाव म्हणजे राजाभाऊ. कोणाचाही द्वेष घडू नये असा बुद्धविचार आचरणात आणणाऱ्या राजनेत्याचं नाव राजाभाऊ. चंद्रपूरचं नाव इतिहासाच्या छातीवर कोरणाऱ्या खोबरागडे घराण्यातील सुपुत्राचे नाव आहे राजाभाऊ. जो सर्वाचा भाऊ तो भाऊराव आणि मनाने राजासारखा तो राजाभाऊ.